किल्ले राजगड
गडाचे बांधकाम :-
तोरणा या किल्ल्याचे बांधकाम सुरू असताना सापडलेल्या धनाच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुदा सन १६४५ मधे या मुरंबदेव या डोंगराचे रूपांतर राजगडसारख्या भक्कम किल्ल्यामधे रूपांतर केले .
गडाचा इतिहास :-
छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या वयाच्या १४ व्या वर्षी तोरणा या किल्ल्या बरोबरच राजगड हा किल्ला बांधला . राजगड किल्ला हा तसा इसविसनाच्या पहिल्या शतकातील किल्ला आहे. सर्वप्रथम डोंगराला किल्ल्याचे स्वरूप गौतमिपुत्र सातकर्णी याने दिले. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले केंद्रबिंदू ,तसेच स्वराज्याची पहिले राजधानी सुद्धा राजगडच .
सुमारे १४९० मधे निजामशाहीचा संस्थापक "अहमद बहिरी" याने हा किल्ला हस्तगत केला .किल्ल्यावर जो पर्यंत निजामशाही होती तो पर्यंत सुमारे १२५ वर्ष या किल्ल्यावर कोणाचाही हल्ला झाला नाही .निजामशाहीनंतर हा किल्ला आदिलशाहीकडे आला .निजामशाहीच्या काळात किल्ल्याची व्यवस्था पाहण्याचे काम "बाजी हैबतराव शिळीमकर" व त्यांचे वडील "रुद्राजी नाईक" यांच्या कडे होते .पुढे आदिलशाहाचा वजीर "मलिक अंबर" याच्या आदेशानुसार किल्ल्याचा ताबा हैबतखानाकडे देण्यात आला .
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहुन जेव्हा ( १२ सप्टेंबर १६६६ ) सुखरूप निसटून आले ते प्रथम राजगडावर . २४ फेब्रुवारी १६७० ल राजाराम महाराज यांचा जन्म राजगडावर झाला .सन १६७२ ल शिवाजी महाराज यांनी आपला मुक्काम रायगडावर नेला .औरंगजेबाने १७ फेब्रुवारी १७०४ ला स्वतः जातीने हा किल्ला जिंकून घेतला .
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :-
गडावर जाण्याची व्यवस्था :-
कर्जत ,पाली ,पुणे , गुंजवणे येथून एसटी महामंडळाच्या एसटी गाड्या अथवा खासगी वाहन .
गडावर जाण्याचे मार्ग :-
१ : गुप्त दरवाज्याने .
२ : पाली दरवाज्याने .
३ : गुंजवणे दरवाज्याने .
४ : आळू दरवाज्याने .
Kdk bhai
ReplyDelete